Posts

Showing posts from February, 2022

मला आवडलेले पुस्तक, वैचारिक लेखन, मराठी, निबंध-वैचारिक लेखन-मला पुस्तक, mala aavdlele pustak, vaicharik lekhan marathi

वैचारिक लेखन प्रश्न :  मला आवडलेले पुस्तक या विषयावर वैचारिक लेखन करा. उत्तर :  मला आवडलेले पुस्तक             ' पुस्तकांसारखा परममित्र दुसरा नाही. ' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. या वाक्याची सत्यता मला आताशा पटू लागली आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी एक वाचनालयाचे सदस्यत्व घेतले. अनेक पुस्तके माझ्या वाचनात आली. 'श्यामची आई '  या पुस्तकाने माझे  जिंकले. साने गुरुजींनी वर्णन केलेली आई वाचताना नकळत किती वेळा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागत. पुस्तकातला ' श्याम ' मीच आहे, असे वाटू लागायचे.           आईने श्यामला कसे घडविले याचे वर्णन पुस्तक मी कितीतरी वेळा वाचले आणि त्या पुस्तकाचा परिणाम नकळत माझ्या जीवनावर झाला. आईला दैवत मानण्याइतके शहाणपण माझ्यात आले. तडजोड करण्याची वृत्ती माझ्यात नव्हती. गरिबीविषयी माझ्या मनात चीड होती. मी माझा त्यागा व्यक्त करायचो; पण आता तक्रार न करता, समजुतीच्या चार गोष्टी लहान बहिणीला सांगण्याचे शहाणपण माझ्यात आले आहे. हा सारा श्यामच्या आईचा परिणाम !       ...

रस्त्याचे मनोगत, आत्मकथन, रस्त्याचे मनोगत ह्या विषयावर आत्मकथन करा, रस्त्याचे आत्मकथन, निबंध-मनोगत- आत्मकथन.

आत्मकथन प्रश्न :   रस्त्याचे मनोगत या विषयावर आत्मकथन करा. उत्तर : रस्त्याचे मनोगत            ऊन मी म्हणत होतं. माझी सायकल दादा घेऊन गेला होता आणि मला क्लासला जायचे होते. जर केले नाही तर बाबांचा मार नाहीतर क्लासच्या सरांचे बोलणे बसेल म्हणून मी क्लासला पायी चालत निघाले. रणरणत्या उन्हात रस्ता नुसता तळपत होता. भर दुपार असल्याने रस्त्यावर रहदारी थोडी कमीच होती. मी रोज सायकलवर जाते तर मधीच खड्डे आले तर मी रस्त्यावर वैतागायची आणि बाजूने सायकल घेऊन जायची. पण मी आता रस्त्याने अगदी आत्मयितेने पाहत चालले होते. तर काय गम्मत झाली, रस्ता चक्क माझ्याशी बोलू लागला. "मुली, तू आज माझ्याकडे एवढी आत्मयितेने बघते हे पाहून माझे हृदय अगदी गलबलून आले. नाहीतर ह्या धावपळीच्या जीवनात तुम्हाला माझ्याकडे लक्ष द्यायला किंवा माझ्याविषयी विचार करायला वेळ तरी असतो का? तू आता माझा विचार करत आहेस हे पाहून तुझ्याशी बोलायचे धाडस केले.           अगं, तू जेव्हा खुश असशील शाळेतही जात नसशील तेव्हा इथे फक्त पायवाट होती. माझ्या अवतीभोवती छोट्या-छोट्या झाडांची ग...

प्रदूषण एक समस्या, वैचारिक लेखन, निबंध, pradushan ak samasya vaicharik lekhan.

वैचारिक लेखन  प्रश्न :  प्रदूषण एक समस्या या विषयावर वैचारिक लेखन करा. उत्तर : वैचारिक लेखन           अंगावर आदळणारी गर्दी, शहरांचा असह्य वेग, हरतर्हेचे अटळ प्रदूषण, बेकारी, दारिद्र्य, गुन्हेगारी अशा अनेक समस्या भारतापुढे 'आ' वासून उभ्या आहेत. यातील ' प्रदूषण ' हि समस्या तर आपल्याला आरोग्याला घातक अशी आहे.            भारतात औद्योगिकरण आले आणि कारखानदारी वेगाने वाढली. पूर्ण विचाराअभावी आणि नियोगनभावी सुरु झालेल्या कारखानदारीने हवेचे प्रदूषण निर्माण केले हे आपल्या लक्षातसुद्धा आले नाही. तसेच, कारखान्यातील अस्वच्छ, दूषित पाण्यामुळे नद्या व समुद्र यांचे पाणी दूषित झाल्याने ते पिण्यायोग्य राहिले नाही. कितीतरी लोक नदी, कालवा अशा ठिकाणी निर्माल्य, नारळ, नैवेद्य टाकतात. त्यामुळे गंगा-शुद्धीकरणाचा प्रकल्प हाती घ्यावा लागतो. परंतु ते दूषित होणार नाही. प्रदूषण टाळण्यासाठी कारखान्यांभोवती भरपूर झाडे असणे आवश्यक आहे. त्यासाठी कारखान्यांचे विकेंद्रीकरण केले पाहिजे हे लक्षात न घेतल्याने औद्योगिक विभागात प्रचंड प्रमाणात प्रदूषण वाढले आ...

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना. प्रसंगलेखन. अनुभवलेखन. मी पाहिलेला क्रिकेटचा सामना या विषयावर प्रसंगलेखन लिहा.

प्रसंगलेखन  प्रश्न :  मी पाहिलेला क्रिकेटचा सामना या विषयावर प्रसंगलेखन लिहा. उत्तर :  मी पाहिलेला क्रिकेटचा सामना                लहानपणी मित्रांबरोबर क्रिकेटचा खेळ खेळताना मी नेहमी चिडत असे. मला आउट व्हायला आवडत नसे आणि नेहमी तेच माझ्या नशिबी येत असे. मला क्रिकेट खेळण्याची  होती तशी मला बघण्याची खूप आवड असे. खरं तर आपण अनेक सामन्यांचा थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर घरबसल्या पाहतो आणि ते अशक्य असल्यास रेडिओवरून ऐकतो. पण प्रत्यक्ष मैदानात आणि तोही अगदी जवळून एखादा चुरशीचा सामना पाहण्यात आनंद काही वेगळाच असतो.               मी पाहिलेलों साच एक चुरशीचा सामना मी कधी विसरणार नाही. हा सामना म्हणजे माझ्या शालेय जीवनातील एक ऎस्मर्णीय प्रसंगच, तेव्हा मी ९वी मध्ये होतो. मंगळवार दि, ३०.३.१९ रोजी भारत-श्रीलंका यांच्यात सामना होता. माझ्या बाबांनी दोनच तिकिटे काढून आणली आणि मला म्हणाले, "मी दोनच तिकिटे काढून आणली आहेत तुझी आई आणि मी जाणार आहे, तुझी परीक्षा तोंडावर आली आहे. तू अभ्यास करत बस." पुढे ते काहीत...

पुढील मुद्द्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर तुमचे लिहा. वैचारिक लेखन. ग्रामीण सहजीवन.

वैचारिक लेखन  प्रश्न :  पुढील मुद्यांच्या आधारे दिलेल्या विषयावर तुमचे विचार लिहा.  उत्तर :  ग्रामीण सहजीवन             आमच्या गावी आमचे घर आहे. शेती आहे. तेथे आमचे काका राहतात. आम्ही शहरात राहतो. एकदा काका आमच्याकडे चार दिवसांसाठी आले होते. रात्री आम्ही जेवायला बसलो होतो. गप्पाटप्पा जोरात चालू होत्या. काका गावच्या गमतीजमती सांगत होते. हास्यविनोद चालू होते. तेवढ्यात अचानक गावाहून फोन आला. काकांच्या घरात घरफोडी झाली होती. तोडफोडीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घाव घेतली. गावी घरे दूर दूर असतात. त्याचा चोरटयांनी फायदा घेतला होता. परंतु आरडाओरडा करून लोकांनी सर्वाना गोळा केले. चोरांशी झट्पट केली. त्यानं चोप दिला आणि पोलिसांकडे सुपूर्द केले. काका धावतपळत गावी गेले. स्वतः च्या जीवाची पर्वा न करता गावकरी चोरांना भिडले होते. शेजाऱ्यांमुळे खूप मोठी हानी टाळली होती. काकांचा उर भरून आला. त्यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले. " आहो, आभार कसले मानता ? आज तुमच्यावर पाळी आली उद्या आमच्यावर हि येऊ शकते. सर्वानी एकमेकांना मदत केली, तर आपले सगळ्यांचेच भले...

पुढील मुद्द्यांच्या आधारे मोबाइलला तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून लिहा. आत्मकथन. मी मोबाइलला बोलतोय.

आत्मकथन प्रश्न:  पुढील मुद्द्यांच्या आधारे मोबाइलला तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून लिहा. उत्तर: मी मोबाईल बोलतोय !                हॅलो, हॅलो !  मी मोबाइलला बोलतोय ! मी तुमचा मोबाईल ! आज मी काहीसा खट्टू झालो होतो. सगळीकडून माझ्यावर दोषारोप वहाहयचे. मी मुलांना बिघडवतोय. थोरांना नादाला लावतोय. उपयोग कमी आणि कोडकौतुक फार, असे अनेक आरोप माझ्यावर होत होते.                 तस पहिले तर काही अंशी ते खरेच होते. मूळ अभ्यास किंवा महत्वाची कामे सोडून माझ्याशी खेळत बसायचे. मोठी माणसेही माझा दुरुपयोग करीत होतीच तासंतास गप्पा मारणे, निरर्थक एसेमेस पाठवणे हे सर्रास चाले. माझ्यावर आलेल्या माहितीची सत्यता तपासून पाहण्याची तसदी घेत नाही. लगेच माहिती दुसर्यांना पाठवतो. त्यामुळे अफवा पसरतात. काही ठिकाणी तर यांमुळे तंटे उभे राहिले आहेत. रस्त्याने चालताना किंवा गाडी माझ्या साह्याने बोलण्यामुळे अनेकदा गंभीर प्रसंग उद्भवले आहेत. मला कानाशी लावून रास्ता ओलांडताना किंवा रेल्वे रूळ ओलांडताना काहीजणांनी प्राण गमावले आ...