पहिला पाऊस, मराठी, निबंध, प्रसन्गलेखन, pahila paaus marathi vaicharik lekhan.
निबंध लेखन वैचारिक लेखन प्रश्न : पहिला पाऊस या विषयावर वैचारिक लेखन करा. उत्तर : पहिला पाऊस ' नेमेचि येतो मग पावसाळा ' असे आपण म्हणत असलो, तरी नियमाप्रमाणे आपण पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. कार्टं त्यापूर्वी ग्रीष्माच्या भव्य कढईत आपल्या देहाची अगदी लाही लाही उडालेली असते, म्हणून म्हणून 'पहिला पाऊस' हा हवा हवासा असणारा पाहून ठरतो. कारण उकडणे जीव नकोस व्हायचा. घरात बसूनसुद्धा चैन पडत नव्हते. पाखरे झाडांच्या फांद्यांवरून बसलेली होती. दूरवर खिडकीतून माळ दिसत होता. रणरणते ऊन त्याला भाजून काढत होते. गुरे झाडाखाली विसावली होती. सारे कसे शांत वाटत होते; पण सुतकी वातावरण वाटत होते. तेवढ्यात अचानक एक झुळूक आली. ती कुठून तरी पाण्यावर लोळून आली होती. तो ओला स्पर्श अंगाला असा काही सुखकर वाटला ! झाडांची सुद्धा मरगळ नाहीशी झाली. तीही थोडी शहारली. पाखरांनी पंख फडफडविले. गाई-गुरे उभी राहिली. वारा सुटला, धूळ उळा...